राज्य विधानसभेच्या 288 जागांपैकी आतापर्यंत 54 जागांचे निकाल अधिकृतरित्या जाहीर झाले आहेत. यापैकी भारतीय जनता पक्षानं 19 जागांवर विजय मिळवला आहे. मित्रपक्ष शिवसेनेला 12 जागांवर विजय मिळवले आहेत, तर राष्ट्रवादी पक्षानं 9 जागी विजय मिळवला आहे.
एकूण 205 मतदार संघातील चित्र मतमोजणीच्या कलाद्वारे स्पष्ट झाले आहे. यापैकी भाजपा 81 जागांवर, शिवसेना 44 जागांवर आघाडीवर आहे. विजय आणि मतदानात आघाडी एकत्रितपणे लक्षात घेतल्यास भाजपा शिवसेना महायुतीला 156 जागी विजयाचे संकेत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 78 जागांवर विजय मिळतील असे चित्र आहे. काँग्रेसला 32 जागांवर मताधिक्य मिळत आहेत, तर राष्ट्रवादीला 46 जागांवर महाराष्ट्र नवनिमार्ण सेना-मनसेला एका मतदार संघात मताधिक्य लाभले आहे. राज्यभरात सर्व मतदान मोजणी केंद्रात मतमोजणीच्या फे-या प्रगती पथावर आहेत. काही वेळातच राज्याच्या मतदार संघातील निकाल हाती येतील, असं दिसते.
विजय घोषित झालेल्या उमेदवारामधे भारतीय जनता पक्षाचे अहेरी मतदार संघातील अंबरीशराव अत्राम, अकोला पूर्व मध्ये रणधीर सावरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोली मध्ये संदीप नाईक, अहमदनगरमध्ये संग्राम जगताप, अकोलेमध्ये मधुकरराव पिचड, काँग्रेस पक्षाचे अक्कलकोटमध्ये सिद्धराम म्हेत्रे, अक्कलकुवा के.सी पडवी आणि अहमदपूर मधून अपक्ष विनायकराव जाधव पाटील आणि अचलपूरमधे बच्चु कडू यांची नावे निवडणूक आयोगाने घोषित करुन वेबसाईटवर दिली आहेत.