अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
ही नुकसान भरपाई देता यावी यासाठी या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचं नुकसान झालं आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या अनेक जिल्ह्यांत प्रामुख्याने भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि केळीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.