जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम ३७० रद्द करणे का आवश्यक होते ते सांगताना जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या विकासाची रुपरेखा मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून जी आक्रमक भाषा सुरु आहे किंवा त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्यावर काहीही भाष्य केले नाही.
देशाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, शामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी आणि कोटयावधी देशवासियांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरचा काय फायदा झाला? हे आतापर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही असं मोदी म्हणाले. पाकिस्ताने कलम ३७० चा दहशतवादासाठी शस्त्रासारखा वापर केला अशी टीका त्यांनी केली.
मोदीं च्या भाषणातील मुद्दे
सावधगिरी म्हणून सरकारने काही पावले उचलली आहेत. त्याला तिथली जनता सहकार्य करत आहेत.
– जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सामान्य होईल आणि तिथल्या लोकांना होणारा त्रास कमी होईल.
– ईदच्या वेळी लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे.
– कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ज्यांना पटलेला नाही त्यांनी सुद्धा देशहिताला पहिले प्राधान्य द्यावे. जम्मू-काश्मीर, लडाखच्या विकासात सहकार्य करावे.
– कंपन्यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूकीचा विचार करावा. टेक्नोलॉजीमुळे काश्मिरी जनतेचे जीवन अधिक सुसहय होईल.
– जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याची क्षमता आहे. मला यासाठी देशवासियाच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
– परिस्थिती सामान्य झाली तर काश्मीरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. यामुळे रोजगार वाढेल.
– चित्रपट सृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा.
– कलम ३७० हटवल्यानंतर नवे सदस्य पंचायत व्यवस्थेत काम करताना कमाल करुन दाखवतील हा माझा विश्वास आहे.
– जम्मू-काश्मीरची जनता फुटीरतवादाला पराभूत करेल.
– पंचायत निवडणुकीत निवडून आलेले लोक जम्मू-काश्मीरमध्ये चांगले कार्य करत आहेत.
– कलम ३७० हटवल्यानंतर नवे सदस्य पंचायत व्यवस्थेत काम करताना कमाल करुन दाखवतील हा माझा विश्वास आहे.
– जम्मू-काश्मीरची जनता फुटीरतवादाला पराभूत करेल.
– जम्मू-काश्मीरचा लोकप्रतिनिधी काश्मीरची जनताच निवडेल. केंद्रशासित प्रदेश असला तरी मंत्रिमंडळाची रचना आधी होती तशीच असेल.
– काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल.
– जम्मू-काश्मीरला केंद्राच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय खूप विचार करुन घेण्यात आला आहे.
– राज्यपाल राजवट असल्यामुळे काश्मीरमध्ये आता सुशासन दिसत आहे. कागदावर असलेल्या अनेक योजना आता प्रत्यक्षात दिसत आहेत.
– जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारे.
– नव्या व्यवस्थेत पोलिसांसह राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य राज्यांसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न.
– जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना अन्य राज्यांच्या पोलिसांसारख्या सुविधा मिळत नाहीत. त्या लवकरच दिल्या जातील.
– काश्मीर आणि लडाखमध्ये रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल. ज्यामुळे युवकांना रोजगार मिळेल.
– देशाच्या अन्य राज्यात मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे पण जम्मू-काश्मीरमध्ये मुले शिक्षणापासून वंचित होती. त्यांचा काय गुन्हा होता?
– देशातील अन्य राज्यांमध्ये मुलींना जे अधिकार मिळतात ते जम्मू-काश्मीरच्या मुलींना मिळत नाहीत.
– जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० चा पाकिस्तानने शस्त्रासारखा वापर केला.
– तीन दशकात ४२ हजार निष्पाप नागरीकांना प्राण गमवावे लागले.
– जम्मू-काश्मीर लडाखचा विकास त्या वेगाने होऊ शकला नाही.
– सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर आणि कोटयावधी देशभक्तांचे जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले आहे.
– जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
