मुंबई- पुणे दरम्यानचा प्रवास अतिवेगवान करण्यासाठीच्या हायपरलूप प्रकल्पाला आज पायाभूत सुविधा प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लवकरच हायपरलूप प्रकल्प अस्तित्वात येणार असून या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हे अतंर अवघ्या २३ मिनिटाचं होणार आहे.
हायपरलूप ट्यूबची एक सीरिज असते. त्यात अनेक पॉड्स असतात. त्यातून एअरलेस प्रवास करणं शक्य होतं. ही हायपरलूप ट्यूब सर्वसाधारण एक्सप्रेस आणि बुलेट ट्रेनपेक्षाही अतिवेगाने धावते. लास वेगस येथे या हायपरलूप वनची चाचणी करण्यात येणार आहे. हायपरलूप वनचा वेग ताशी १,२२० किलोमीटर इतका असतो. मात्र अद्याप त्याची चाचणी झालेली नाही. हायपरलूप वन सुरू झाल्यानंतर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते वाकड (पुणे) दरम्यानचं ११७.५ किलोमीटरचं अंतर अवघ्या २३ मिनिटात पार करता येणार आहे.
