महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यावरील निकाल सुप्रीम कोर्टाने मंगळवारी राखून ठेवला. फडणवीस यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढविताना त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवली, त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सतिश उके यांनी दाखल केली आहे. ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवताना खटल्यादरम्यान याचा विचार केला जाईल असे सांगितले.
