शिवसेनेशी हातमिळवणी केल्यास त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात याची पूर्वकल्पना असूनही केवळ नेत्यांचा दबाव आणि आमदार फुटण्याची भीती लक्षात घेऊनच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेतेमंडळींचा विरोध डावलून शिवसेनेला साथ देण्यास मान्यता दिली.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निकालानंतर भेट घेतली असता सोनियांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. तशी माहिती पवार यांनीच दिली होती. पण शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाल्यावर पुन्हा संयुक्त सरकारची चर्चा सुरू झाली. शिवसेनेला साथ देण्यास काँग्रेस नेतृत्व अजिबात तयार नव्हते. याच वेळी राज्यातील आमदारांना जयपूरला सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. राज्यात बिगर भाजप सरकारसाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे, असा आग्रह आमदारांच्या एका गटाने धरला. पण सोनियांचा नकार मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावरून आमदारांनी बराच गोंधळ घातला.
पक्ष नेतृत्व तयार नसल्यास ३० पेक्षा जास्त आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेला पाठिंबा देऊ, अशी धमकीच आमदारांनी दिली होती. काही आमदारांनी तर स्वाक्षऱ्या जमा करण्यास सुरुवातही केली होती. विधिमंडळ पक्ष फुटू शकतो, असे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आलो. पक्षाने काहीही मदत केली नाही. नेतेमंडळींच्या प्रचारसभाही झाल्या नाहीत, असे आमदारांनी नेत्यांना बजावले. आमदार फुटतील हे गृहीत धरून नेते सावध झाले आणि नेतृत्वाच्या तसे कानावर घालण्यात आले.
राज्यातील नेतेमंडळींचा दबाव आणि आमदारांचा गट फुटू शकतो याची काँग्रेस नेतृत्वाला भीती वाटल्यानेच सोनिया गांधी यांनी अखेर शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास मान्यता दिली. आधी बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव होता. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका मांडली. शेवटी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे काँग्रेसने मान्य केले. आमदार फुटले तरी पक्षाचे नुकसान आणि शिवसेनेबरोबर युती केली तरीही नुकसान अशी काँग्रेसची दुहेरी कोंडी झाली. यातूनच काँग्रेसने आमदारांना खूश ठेवण्यावर भर दिला आहे.
मुख्यमंत्रिपदीउद्धवचहवेत; काँग्रेसचाआग्रह
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच करावे, अशी अट काँग्रेसने घातली आहे. अन्य कोणतेही नाव काँग्रेसला मान्य नसेल. संयुक्त सरकारचे नेतृत्व कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनीच सरकारचे नेतृत्व करावे, असा काँग्रेसचा आग्रह आहे. शिवसेनेने अद्याप याबाबतचे पत्ते खुले केलेले नाहीत. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई किंवा आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणाचेही नाव काँग्रेसला मान्य नसल्याचे समजते. आघाडीची चर्चा सुरू करतानाच, उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे, अशी काँग्रेसची पहिली अट होती. तेव्हा शिवसेनेने होकारही दिला होता. अस्थिर राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्व करण्याबाबत शिवसेनेमध्ये साशंकता आहे. सरकारचे नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे हेच करतील, अशी खासदार संजय राऊत यांची भूमिका आहे.
Pingback: 카지노사이트
Pingback: https://www.pinterest.com/ketquaxosotv/
Pingback: นาโนไฟแนนซ์
Pingback: English To Russian Translation
Pingback: cbd for pets
Pingback: dang ky 188bet
Pingback: 63.250.38.81
Pingback: buy axiolabs
Pingback: navigera till den här webbplatsen
Pingback: 사설토토
Pingback: w88
Pingback: data hk 2020
Pingback: Tree Trimming near me
Pingback: rolex replica
Pingback: wigs
Pingback: midget sex doll for sale
Pingback: Avermedia F50HD manuals
Pingback: wigs for women
Pingback: Highland Tow
Pingback: 마나토끼
Pingback: 킹스포커
Pingback: cc shop legit
Pingback: 메이저놀이터
Pingback: munib.org
Pingback: automatic baton
Pingback: สล็อตเว็บตรง
Pingback: novaทุกรุ่น
Pingback: Masturbação Na Webcam Sexo
Pingback: Russian Model Chaturbate
Pingback: Digital transformation consulting firms
Pingback: Zastava Arms AK 47 ZPAP M70 Wood Furniture
Pingback: dumps cc website 2022
Pingback: sbo
Pingback: แอพเงินด่วน
Pingback: เงินด่วน ออนไลน์ โอนเข้าบัญชี