मराठी

आमदारांच्या दबावामुळेच शिवसेनेला साथ देण्यास सोनिया गांधी तयार

शिवसेनेशी हातमिळवणी केल्यास त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात याची पूर्वकल्पना असूनही केवळ नेत्यांचा दबाव आणि आमदार फुटण्याची भीती लक्षात घेऊनच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेतेमंडळींचा विरोध डावलून शिवसेनेला साथ देण्यास मान्यता दिली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निकालानंतर भेट घेतली असता सोनियांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. तशी माहिती पवार यांनीच दिली होती. पण शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाल्यावर पुन्हा संयुक्त सरकारची चर्चा सुरू झाली. शिवसेनेला साथ देण्यास काँग्रेस नेतृत्व अजिबात तयार नव्हते. याच वेळी राज्यातील आमदारांना जयपूरला सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. राज्यात बिगर भाजप सरकारसाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे, असा आग्रह आमदारांच्या एका गटाने धरला. पण सोनियांचा नकार मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावरून आमदारांनी बराच गोंधळ घातला.

पक्ष नेतृत्व तयार नसल्यास ३० पेक्षा जास्त आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेला पाठिंबा देऊ, अशी धमकीच आमदारांनी दिली होती. काही आमदारांनी तर स्वाक्षऱ्या जमा करण्यास सुरुवातही केली होती. विधिमंडळ पक्ष फुटू शकतो, असे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आलो. पक्षाने काहीही मदत केली नाही. नेतेमंडळींच्या प्रचारसभाही झाल्या नाहीत, असे आमदारांनी नेत्यांना बजावले. आमदार फुटतील हे गृहीत धरून नेते सावध झाले आणि नेतृत्वाच्या तसे कानावर घालण्यात आले.

राज्यातील नेतेमंडळींचा दबाव आणि आमदारांचा गट फुटू शकतो याची काँग्रेस नेतृत्वाला भीती वाटल्यानेच सोनिया गांधी यांनी अखेर शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास मान्यता दिली. आधी बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव होता. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका मांडली. शेवटी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे काँग्रेसने मान्य केले. आमदार फुटले तरी पक्षाचे नुकसान आणि शिवसेनेबरोबर युती केली तरीही नुकसान अशी काँग्रेसची दुहेरी कोंडी झाली. यातूनच काँग्रेसने आमदारांना खूश ठेवण्यावर भर दिला आहे.

मुख्यमंत्रिपदीउद्धवचहवेत; काँग्रेसचाआग्रह

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच करावे, अशी अट काँग्रेसने घातली आहे. अन्य कोणतेही नाव काँग्रेसला मान्य नसेल. संयुक्त सरकारचे नेतृत्व कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनीच सरकारचे नेतृत्व करावे, असा काँग्रेसचा आग्रह आहे. शिवसेनेने अद्याप याबाबतचे पत्ते खुले केलेले नाहीत. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई किंवा आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणाचेही नाव काँग्रेसला मान्य नसल्याचे समजते. आघाडीची चर्चा सुरू करतानाच, उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे, अशी काँग्रेसची पहिली अट होती. तेव्हा शिवसेनेने होकारही दिला होता. अस्थिर राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्व करण्याबाबत शिवसेनेमध्ये साशंकता आहे. सरकारचे नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे हेच करतील, अशी खासदार संजय राऊत यांची भूमिका आहे.

35 Comments

35 Comments

  1. Pingback: 카지노사이트

  2. Pingback: https://www.pinterest.com/ketquaxosotv/

  3. Pingback: นาโนไฟแนนซ์

  4. Pingback: English To Russian Translation

  5. Pingback: cbd for pets

  6. Pingback: dang ky 188bet

  7. Pingback: 63.250.38.81

  8. Pingback: buy axiolabs

  9. Pingback: navigera till den här webbplatsen

  10. Pingback: 사설토토

  11. Pingback: w88

  12. Pingback: data hk 2020

  13. Pingback: Tree Trimming near me

  14. Pingback: rolex replica

  15. Pingback: wigs

  16. Pingback: midget sex doll for sale

  17. Pingback: Avermedia F50HD manuals

  18. Pingback: wigs for women

  19. Pingback: Highland Tow

  20. Pingback: 마나토끼

  21. Pingback: 킹스포커

  22. Pingback: cc shop legit

  23. Pingback: 메이저놀이터

  24. Pingback: munib.org

  25. Pingback: automatic baton

  26. Pingback: สล็อตเว็บตรง

  27. Pingback: novaทุกรุ่น

  28. Pingback: Masturbação Na Webcam Sexo

  29. Pingback: Russian Model Chaturbate

  30. Pingback: Digital transformation consulting firms

  31. Pingback: Zastava Arms AK 47 ZPAP M70 Wood Furniture

  32. Pingback: dumps cc website 2022

  33. Pingback: sbo

  34. Pingback: แอพเงินด่วน

  35. Pingback: เงินด่วน ออนไลน์ โอนเข้าบัญชี

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 2 =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us