मालदीव सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवच्या ‘निशान इज्जुद्दीन’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांनी मोदींना हा सन्मान बहाल केला.
हा सन्मान स्वीकारताना आपणास खूप आनंद होत असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली. ‘भारत कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक संकटात मालदीवसोबत असेल. दोन्ही देशांच्या नागरिकांना विकास आणि स्थिरता हवी आहे. मालदीवमध्ये विकासाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. आपल्या द्विपक्षी सहकार्यामुळे भावी दिशा ठरेल. दोन्ही देशाच्या लोकांचा संपर्क वाढविण्यासाठी आम्ही दोन्ही देशांदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी परस्पर सहमती जाहीर केली आहे,’ असे मोदी म्हणाले.
मोदी जी यांना मिळालेला हा 7 वा, परदेशस्थ सर्वोच्च सन्मान आहे. या सन्मानाने, भारताचे जागतिक राजकारणातील महत्त्व अधोरेखित होते. अवघ्या 5 वर्षाच्या मोदी सरकारच्या बदललेल्या परराष्ट्री…
अवघ्या 5 वर्षाच्या मोदी सरकारच्या बदललेल्या परराष्ट्रीय नितीचे हे फळ आहे, यापूर्वी, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात, केवळ रशिया भारताच्या बाजूने ठामपणे उभा असे आता चीन सोडून बाकी सर्व जग भारताच्या बाजूने उभे रहात आहे.
