थकित रक्कम चुकती न केल्याच्या कारणावरून इंडियन ऑइलसह सर्व तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवला आहे. आतापर्यंत या तेलकंपन्यांनी एकूण सहा विमानतळांवीपरील एअर इंडियाचा इंधनपुरवठा थांबवण्यात आला आहे. असे असले, तरी एअर इंडियाच्या विमानांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरूच आहे.
ज्या विमानतळांवरील इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यांमध्ये रांची, मोहाली, पाटणा, विशाखापट्टणम, पुणे आणि कोच्ची या विमानतळांचा समावेश आहे. आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया थकित कर्जाची परतफेड करू शकणार नाही, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. गुरुवारी संध्याकाळपासूनच हा इंधनपुरवठा बंद करण्यात आला आहे.
