मराठी

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सरकारने असामान्य पावलं उचलण्याची गरज – निती आयोग

देशात आर्थिक मंदीची चर्चा सुरु झाली आहे, या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या शंका-कुशंका दूर करण्यासाठी सरकारने असामान्य पावले उचलणे गरजेचे आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला अप्रत्यक्ष दबाव कमी करण्यासाठी वेगळी पावलं उचलणे गरजेचे आहे. कारण संपूर्ण अर्थ प्रणालीच सध्या संकटात असताना गेल्या ७० वर्षांत या क्षेत्रातील कोणत्याही कंपनीने अशा स्थितीचा सामना केलेला नाही, अशा शब्दांत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी अर्थ व्यवस्थेच्या मंदगतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली भुमिका मांडली.

राजीव कुमार म्हणाले, खासगी कंपन्यांमधील गुंतवणुकीत वेगाने वाढ झाल्यास भारताला मध्यम उत्पन्नाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. सध्या कोणीही कोणावर भरवसा ठेवताना दिसत नाही. खासगी क्षेत्रामध्ये कोणतीही वित्तीय कंपनी कर्ज देण्यास तयार नाही. प्रत्येक जण रोख व्यवहार करण्याची मागणी करीत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सरकारला सर्वसाधारण उपायांव्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीची पावले उचलणे गरजेचे आहे.

याबाबत विस्ताराने सांगताना राजीव कुमार म्हणाले, आर्थिक क्षेत्रातील दबावाशी निपटण्यासाठी आणि आर्थिक अभिवृद्धीला गती देण्यासाठी केंद्रीय बजेटमध्ये यापूर्वीच काही घोषणा करण्यात आल्या आहेत. २०१८-१९ मध्ये हा वृद्धी दर ६.८ टक्के होता जो पाच वर्षातील सर्वांत कमी आहे. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातील दबावामुळे अर्थव्यवस्थेत स्थूलपणा आला आहे. २००९ ते २०१४ दरम्यान कुठलाही विचार न करता देण्यात आलेल्या कर्जांचा हा परिणाम आहे. कारण, त्यामुळे २०१४ नंतर बँकांच्या बुडीत कर्जांमध्ये (एनपीए) वाढ झाली.

कर्जे बुडीत निघाल्याचे प्रमाण वाढल्याने बँकांची नवे कर्जे देण्याची क्षमता कमी झाली आहे. याची पोकळी बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (एनबीएफसी) भरुन काढली. त्यामुळे या कंपन्यांच्या कर्जांमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, एनबीएफसी कर्जांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढीचे व्यवस्थापन करु शकत नाही. त्यामुळे काही मोठ्या कंपन्यांकडून या कर्जांची परतफेड होऊ शकली नाही, त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेत मंदीला सुरुवात झाली.

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

520, Asmi Industrial Complex, Near Ram Mandir Railway Station, Goregaon West, 400104, Mumbai, Maharashtra.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us