भारत विरुद्ध यूझीलंड सामना आज पावसामुळे व्यत्यय आला. नॉटिंघमवर सततच्या पावसामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही.
आयोजकांनी ओव्हर्स कमी करून सामना सुरू करण्यासाठी बर्याच वेळा प्रयत्न केला, परंतु सतत पावसामुळे सामना रद्द करावा लागला. आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
सामना रद्द झाल्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही रद्द होण्याची नामुष्की ओढावू शकते.
